

Pakistan PM Statement On Kashmir: पाकिस्तानची लष्करी आणि नागरी नेतृत्वाने ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा काश्मीरमधील लोकांना आपला न मागितलेले पाठिंबा दिला. यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक मोर्चांचे आंदोलन करण्यात आले होते.
कथित काश्मीर एकदा दिवस प्रसंगी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, 'जम्मू काश्मीर वादावर तोडगा म्हणजे काश्मीरमधील लोकांच्या इच्छेचा आदर करणं आणि युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेचा ठरावावर अमंलबजावणी करणं.' अस वक्तव्य केलं. ते पाक व्याप्त काश्मीरमधील मुज्जफराबादमधील सभागृहात बोलत होते.
शहबाज यांनी आम्ही इथं आमच्या काश्मीरी भावांसाठी पाकिस्तानी लोकांच्या आणि पाकिस्तानी नेतृत्वाच्या वतीने आलो आहे. आम्ही काश्मीरच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत. यानंतर शरीफ यांनी काश्मीर पाकिस्तानचा भाग होणार आहे असं वादग्रस्त वक्तव्य देखील केलं.
भारताने जम्मू काश्मीर आणि लडाख हा यापूर्वी, आता आणि भविष्यातही आमचा भूभाग आहे हे कायम पाकिस्तानला सांगितलं आहे. नुकतेच २०२५ च्या मे महिन्यात पाकिस्तान आणि भारत यांच्यात लष्करी संघर्ष झाला होता. याची आठवण काढत काश्मीरचा मुद्दा राजनैतिक मार्गाने पुन्हा एकदा तावपण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जाईल असं वकव्य शाहबाज शरीफ यांनी केलं.
याचबरोबर शाहबाज यांनी पाकिस्तानात वाढलेल्या दहशतवादी कारवायांना भारताला जबाबदार धरलं आहे. त्यांनी भारतानं छुप्या पद्धतीनं पाकिस्तानातील दहशतवाद वाढवला आहे. ते म्हणाले, 'आम्हाला शांतता हवी आहे मात्र शांतता ही समानता आणि न्याय याच्यावर आधारलेली असते.'
शरीफ यांनी काश्मीरची तुलना पॅलस्टाईनशी करत बुऱ्हान वानी, दिवंगत फुटीरतावादी नेते सईद अली गिलानी, यासिन मलिक, मीरवैज उमर फारूक आणि इतर फुटीरतावादी नेत्यांची देखील आठवण काढली.