पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर (Iran Attacks Israel) मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला या हल्ल्याची किंमच मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. यामुळे तेथील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हाजरी जारी केली. सरकारने भारतीय नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इराणला जाणे टाळावे, अशी सूचना केलीय. इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा आणि तेहरानमधील दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दिल्लीतील इस्रायल दूतावासाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दिल्लीतील इस्रायल दूतावासाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. "आम्ही इराणमधील सुरक्षेशी संबंधित परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी भारतीय नागरिकांना इराणमध्ये सर्व प्रकारचा अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे'', असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इराणाला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचा धोका वाढला आहे.
तेथील परिस्थिती पाहता तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी एक ॲडव्हाजरी जारी केली. भारतीय नागरिक असलेल्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.