नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे 'ऑपरेशन कावेरी' सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विशेष विमानाने ३२८ भारतीय नागरिकांची २०वी तुकडी मायदेशी परतली. महाराष्ट्रातील ३४ नागरिकांचा यात समावेश होता.