धक्कादायक : कोरोना महामारीमुळे ५ कोटी ६० लाख भारतीय गरिबीच्या खाईत - जागतिक बँक
कोरोना महामारीमुळे ५ कोटी ६० लाख भारतीय गरिबीच्या खाईत - जागतिक बँक
पुढारी ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीमुळे भारतातील ५ कोटी ६० लाख लोक गरिबीत ढकलले गेले आहेत, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील ७ कोटी १० लोक दारिद्र्याच्या खाईत फेकले गेले त्यातील सर्वाधिक म्हणजे ७९ टक्के लोक हे भारतातील आहेत, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. Poverty Due To COVID-19
“Poverty and Shared Prosperity 2022” या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, “कोरोना महामारी हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी फार मोठा फटका होता. Global Extreme Poverty Rate हा कोरोना काळात ९.३ टक्के इतका वाढला. कोरोनाच्या पूर्वी हा दर ८.४ टक्के इतका होता. २०२०च्या अखेरीस जगभरताली ७ कोटी १० लाख लोक भीषण गरिबीत ढकलेले गेले. त्यामुळे २०२०ला दारिद्र्यात जगणाऱ्या लोकांची संख्या जगभरात ७० कोटी इतकी झाली.”
Report by World Bank says 56 million people pushed into poverty due to Covid-19 in India. The leaders fuelling religious hate have accumulated wealth that can last generations. Meanwhile foolish citizens who are busy in Hindu-Muslim rhetorics are starving https://t.co/NH8JCykuq2
— Rituparna Chatterjee (@MasalaBai) October 13, 2022
जा देशांची लोकसंख्या अधिक आहे, त्यांचा गरिबीतील वाटाही अधिक आहे. फक्त चीनच्या अर्थव्यवस्थेला २०२०मध्ये मोठा फटका बसला नाही. तर या उलट कोरना काळात भारताची अर्थव्यवस्था दीर्घकाळ संकुचित झाली होती. हा अहवाल बनवताना Centre for Monitoring Indian Economy या संस्थेने जमवलेल्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे. गरिबी हटवण्यात रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने २०२२मध्ये नवा अडथळा निर्माण केला आहे. महागाई, चीनमधील मंदी अशा परिस्थितीमुळे जगाच्या आर्थिक विकासावर मोठा परिणाम झाला आहे.
हेही वाचा
- COVID-19 |ऑक्सफोर्डला मोठा धक्का! नेझल स्प्रे कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी अयशस्वी
- Covid Vaccine : mRNA कोरोना लस हृदय, रक्तवाहिन्यांवर परिणाम करत मृत्यूचा धोका वाढवते, अभ्यासातून आले समोर
- The covid-19 pandemic : कोरोना महामारीचा तरुणाईच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम : नवीन संशोधनातील निष्कर्ष