भाजपमुळे गोव्याची पिछेहाट; अभिषेक सिंघवी यांची टीका
पणजी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या केवळ बढाया मारतात. मात्र, राज्यात या तिन्ही क्षेत्रांत काहीच विकास झाला नसून, येथील या सरकारच्या नाकर्तेपणाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक संघवी यांनी केली.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस नेत्या व मीडिया प्रभारी अलका लांबा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संघवी म्हणाले की, मोदींनी गोव्यातील भाजप सरकारचा कारभार पाहिला पाहिजे, मगत त्यांना पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानात खरोखरच भरभराट झाली की सरकारला अपयशी आले, ते त्यांना समजेल.
भाजप हा आमदार पळविणारा पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक सिंगवी. बाजूला अलका लांबा.
हेही वाचलतं का?
- 'पुष्पा'च्या श्रीवल्लीवर रानू मंडलचा डान्स; लोकं म्हणाली, 'अल्लू अर्जुनपर्यंत पोहोचलाचं पाहिजे'
- यवतमाळ : घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार! आमदार ससाने सह अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
- Owaisi-Shah : 'असदुद्दीन ओवैसी यांनी झेड सुरक्षा स्वीकारून आमचे 'टेन्शन' कमी करावे'
- Rose Day Special : मुधुबाला यांनी गुलाब देऊन दिलीप कुमार यांना 'असं' केलं होतं प्रपोज

