पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा; सुभाष शिरोडकर

Goa water stock | खारेपाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या अभ्यासासाठी अभियंते लक्षद्वीप, चेन्नईला जाणार
Goa water stock
Goa water stock
Published on
Updated on

पणजी : मान्सून येईपर्यंत गोव्याची गरज भागवण्यासाठी राज्यातील जलाशयांमध्ये पुरेसा कच्च्या पाण्याचा साठा आहे, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. जलसंपदा विभाग पाणी उपसा करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा यांसारख्या इतर उपाययोजनांच्या शक्यतेचा विचार करत आहे.

Goa water stock
Pune Water Storage Dams: पुणे जिल्ह्यात धरणांतील पाणीसाठा मिश्र; कुठे दिलासा तर कुठे टंचाईची भीती

त्या पार्श्वभूमीवर खारेपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी अभियंत्यांचे एक पथक लक्षद्वीप आणि चेन्नईला भेट देणार आहे. ते दोन्ही प्रकल्प कसे काम करतात, हे पथक तपासेल. त्या धर्तीवर आपण एक प्रकल्प उभारला, तर आपल्याला वारंवार बंधारे बांधण्याची गरज भासणार नाही. अनेक अरब देश खारेपाणी शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत आहेत, असेही शिरोडकर म्हणाले.

Goa water stock
Gangapur water crisis : गंगापूर तालुक्यातील तब्बल १८ गावे टंचाईग्रस्त

शिरोडकर म्हणाले की, अंजुणे जलाशयातील गाळ काढण्यासाठी लवकरच एक निविदा काढण्यात येईल, ज्यामुळे त्याची क्षमता वाढेल. सध्या आम्ही जलाशयांमधून पाणी सोडत आहोत आणि ते वाहत राहते. आम्ही अशी प्रणाली लागू करू, जिथे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाणी सोडले जाईल. आम्ही ५ किलोमीटरपर्यंतच्या, ६ ते १० किलोमीटरपर्यंतच्या आणि अशाप्रकारे गरजेचा अंदाज घेऊ आणि मग आम्ही पाईपलाईन टाकून गरजेनुसारच पाणी सोडू शकतो. यामुळे आम्हाला धरणांमधील पाणी वाचविण्यात मदत होईल.

Goa water stock
Rajgad Water Scarcity Crisis: राजगड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; 40 गावांसाठी साडेपाच कोटींचा आराखडा

यावेळी शिरोडकर यांनी पुढील उन्हाळ्यापर्यंत आवश्यक पाणीपुरवठ्याची गरज भागवण्यासाठी उचललेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, ३० मे पर्यंत साळ प्रकल्प तयार होईल, सोबतच आणखी १,००० बंधारे उभारले जातील, ज्यामुळे गोव्याची जलक्षमता ५,००० पर्यंत वाढेल. ओपासाठी, परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी ९ मे पासून एका खाणीच्या खड्ड्यातून पाणी उपसले जाईल. जलसंपदा विभाग ३० मे रोजी कुशावती नदीवर एक पंपिंग हाऊस कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे पाणीपुरवठा क्षमता वाढेल आणि साळावलीवरील पाणीपुरवठासाठीचे अवलंबित्व कमी होईल. राज्यातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news