Baba Vanga Predictions : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने खळबळ! भारतावर येणार 'हे' मोठे संकट... | पुढारी

Baba Vanga Predictions : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने खळबळ! भारतावर येणार 'हे' मोठे संकट...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Baba Vanga Predictions बुल्गेरियातील प्रसिद्धा भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी केलेल्या एका भविष्यवाणीवरून मोठी खळबळ उडाली आहे. बाबा वेंगा या आपल्या भविष्यवाणींना घेऊन खूप चर्चेत असतात. भारतात सध्या त्यांनी केलेल्या भविष्यवाणीवरून मोठी खळबळ उडाली आहे. तसेच अनेकांची चिंता वाढली आहे. बाबा वेंगा यांनी यावर्षी भारताविषयी एक भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे विशेष म्हणजे ही भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी खूप वर्ष आधीच करून ठेवली होती.

Baba Vanga Predictions बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये भारतावर भीषण भूकमारीचे संकट येणार आहे. असे सांगितले होते. बाबा वेंगाने याविषयी भाकित केले होते की 2022 मध्ये भारतावर टोळधाडीचे संकट उद्भवणार आहे. जगभरातील तापमानात भारतात मोठ्या प्रमाणात टोळधाड होईल आणि हे टोळधाड पीक फस्त करतील. परिणामी भारतात भूखमरीचे मोठे संकट येईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती.

Baba Vanga Predictions बाबा वेंगा यांनी 2022 साठी 6 भविष्यवाणी केल्या होत्या त्यापैकी दोन ख-या ठरल्या होत्या. बाबा वेंगा म्हणाल्या होत्या 2022 मध्ये सायबेरियातून नवीन प्राणघातक विषाणूच्या आगमनाव्यतिरिक्त, एलियनचे हल्ले, टोळांचे आक्रमण, ऑस्ट्रेलियासह आशिया खंडातील काही देशांमध्ये पूर, काही देशांमध्ये दुष्काळ आणि वाढलेली आभासी वास्तविकता याबाबत भाकित केले होते. यापैकी पूर आणि दुष्काळाबाबतचे अंदाज खरे ठरले आहेत. 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया तसेच आशियातील पाकिस्तान हे दोन्ही देश पूराच्या संकटातून जात आहेत. तर इटलीच्या काही शहांमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आहे. बाबा वेंगाच्या दोन भविष्यवाणी ख-या ठरल्याने त्यांनी भारताबद्दल केलेल्या भविष्यवाणीमुळे चिंता वाढली आहे.

Baba Vanga Predictions कोण आहेत बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गेरियामध्ये 1911 मध्ये झाला होता आणि ते त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. बाबा बेंगा यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी अपघातात त्यांचे दोन्ही डोळे गमावले आणि त्यांना दिसू शकले नाही. जरी बाबा वेंगा स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नसल्या तरी तिच्याकडे एक विशेष शक्ती होती. ज्याद्वारे ती भविष्य पाहू शकते. असा दावा केला जातो की देवाने त्यांना दिव्य दृष्टी दिली होती आणि त्यामुळे त्यांची दृष्टी गेली.

हे ही वाचा:

किनारी येऊन गतप्राण झाले 200 व्हेल मासे

‘एलियन’शी झाला संपर्क?; शास्त्रज्ञांना अंतराळातून पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळाले, ते रेकॉर्डही केले

Back to top button