रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : शहरानजीकच्या भाट्ये पुलावर दुग्धव्यवसाय करणार्या व्यक्तीने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (दि.९) सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुरुनाथ सखाराम पाटील (52,रा.जाकिमिर्या,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचे भाउ राजेश सखराम पाटील (रा.जाकिमिर्या,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. गुरुनाथ पाटील हे दुग्ध व्यवसाय करायचे. शनिवारी सकाळी 9 वाजता ते नेहमीप्रमाणे दुग्ध व्यवसायासाठी घराबाहेर पडले होते.
दरम्यान 9.45 वाजण्याच्या सुमारास भाट्ये येथील नागरिकांना भाट्ये पुलाच्या रेलिंगला नायलॉन दोरीने गळफास घेतेलल्या अवस्थेत एक व्यक्ती दिसून आला. त्यांनी याची माहिती प्रथम भाट्ये पुला शेजारी असलेल्या चौकीतील होमार्ड आणि शहर पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.