नवाब मलिक : ‘क्रुझवरील ११ लोकांना ताब्यात घेतले, तर त्या ३ जणांना NCB ने का सोडले?’ | पुढारी

नवाब मलिक : 'क्रुझवरील ११ लोकांना ताब्यात घेतले, तर त्या ३ जणांना NCB ने का सोडले?'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी व्हिडिओ सादर करून भाजपवर हल्ला चढवला. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केला आहे. त्यांचे दिल्लीत कोणाशी संबंध आहेत? अशी विचारणा त्यांनी केली.

क्रुझवरील पार्टीत भाजप नेत्यांच्या मेहुण्याचा समावेश होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला. रुषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाभाला का सोडण्यात आले, अशी विचारणा त्यांनी केली. क्रुझवरील ११ लोकांना ताब्यात घेतले, तर त्या ३ जणांना NCB ने का सोडले? असे ते म्हणाले. रिषभ सचदेव हा मोहित भारतीय यांचे मेहुणे असल्याचे ते म्हणाले.

रिषभ सचदेव हा भारतीय युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा डाव आहे, या डावामध्ये भाजपचा सहभाग असल्याचा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला.

या प्रकरणातील सत्य समोर समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबई पोलिसांनी सर्वांचे कॉल रेकॉर्ड तपासावे असे ते म्हणाले. या प्रकरणात पंचनामेही बनावट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

VIDEO :  नवाब मलिक काय म्हणाले ?

हे ही वाचलं का?

Back to top button