मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : परमवीरसिंग यांचे भाजपसोबत 'डील' झाले यामुळेच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हिरेन हत्या प्रकरणाला त्यांना अटक केली नाही, असा आराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे, असा दावाही मलिक यांनी केला.
हिरेन हत्या प्रकरणी अटक हाेणार हे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी भाजपसोबत 'डील' केले. या प्रकरणात काेणाला आराेपी करायचं आणि कुणाला नाही, हे अधिकार भाजप 'एनआयए' आहेत. तेच आता कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत ते एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नबाब मलिक यांनी लगावला.
हेही वाचलं का?