प्रातिनिधिक छायाचित्र. 
Latest

यवतमाळ : कमी गुण मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची आत्महत्या

Shambhuraj Pachindre

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वणी शहरालगतच्या लालगुडा येथे गुरूवारी सकाळी ही घटना घडली.

सेजल उर्फ मोनू अनिल सालूरकर (१७) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे तिला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा तिला होती.

बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात सेजलला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. गुरूवारी सकाळी घरी कुणी नसताना तिने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना उघडकीस आल्यानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT