India vs England T20 World Cup Semi-Final 2026 Suryakumar Yadav reaction file photo
स्पोर्ट्स

IND vs ENG: हृदयाचे ठोके १७५..., भारताच्या विजयाचा ‘टर्न‍िंग पॉइंट’ काय? सामना कोणी पलटवला? सूर्यकुमारने सर्व काही सांगितलं!

India vs England T20 World Cup Semi-Final 2026 Suryakumar Yadav reaction: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या सेमीफायनलमध्ये भारताने एका रोमांचक लढतीत इंग्लंडचा पराभव केला. विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

मोहन कारंडे

India vs England T20 World Cup Semi-Final 2026 Suryakumar Yadav reaction:

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या सेमीफायनलमध्ये भारताने एका रोमांचक लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, भारतात वर्ल्ड कप खेळणे आणि टीमचे नेतृत्व करणे ही त्याच्यासाठी खूप खास आहे, विशेषतः जेव्हा फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, "ही एक अविश्वसनीय भावना आहे. भारतात खेळणे, अशा शानदार टीमचे कर्णधारपद भूषवणे आणि इथे वर्ल्ड कप खेळणे खूप खास आहे. आता फायनल खेळण्यासाठी अहमदाबादला जाणे, आम्हा सर्व खेळाडूंसाठी खूप मोठा क्षण आहे." पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान सूर्याने सामन्याचा 'टर्निंग पॉइंट' काय होता हे देखील सांगितले.

सॅमसनच्या ८९ धावांवर सूर्या काय म्हणाला?

सूर्यकुमारने सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला की, सॅमसन मैदानात उतरतानाच त्याला नक्की काय करायचे आहे हे माहीत होते. जेव्हा जेव्हा विकेट पडली, तेव्हा त्याने आपली आक्रमकता कायम ठेवली. टीमला ज्या प्रकारच्या खेळीची गरज होती, अगदी तशीच फलंदाजी त्याने केली. गेल्या वर्षभरापासून त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ आज त्याला मिळाले."

बुमराह आणि गोलंदाजांनी फिरवला सामना

सामन्याच्या निर्णायक वळणावर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि तिथूनच सामना भारताच्या बाजूने झुकला, असे सूर्यकुमारने सांगितले. तो म्हणाला, "जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि बाकी गोलंदाजांनी ज्या प्रकारे सामना परत खेचून आणला, ते अविश्वसनीय होते. बुमराह भारतासाठी वर्षानुवर्षे काय करत आला आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आजही त्याने तेच केले आणि सामना आमच्या हाताबाहेर जाऊ दिला नाही."

इंग्लंडच्या कर्णधाराला सूर्याने विचारले, किती स्कोअर करू?

इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सामना खूपच रोमांचक झाला होता. यावर सूर्यकुमारने मजेशीर अंदाजात सांगितले की, त्याने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला विचारले की, त्यांच्याविरुद्ध नक्की किती धावा कराव्या लागतील? तो म्हणाला, "ओह माय गॉड!

फील्डिंग कोच दिलीप टी यांच्याबद्दल सूर्या काय म्हणाला?

भारतीय कर्णधाराने टीमच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी फील्डिंग कोच दिलीप टी याचेही कौतुक केले. तो म्हणाला, "आपल्याला फील्डिंग कोच दिलीप टी यांनाही श्रेय दिले पाहिजे. ते सराव सत्रात खेळाडूंसोबत ज्या प्रकारे काम करतात आणि ते सत्र मजेशीर व स्पर्धात्मक बनवतात, त्याचा परिणाम मैदानावर स्पष्ट दिसतो."

शिवम दुबेला 'प्रमोट' का केले?

सूर्यकुमारने हे देखील स्पष्ट केले की, टीममध्ये नंबर ३ पर्यंत सर्व काही ठरलेले होते, त्यामुळे त्यांना बदल करायचा नव्हता. परंतु एका विशिष्ट 'मॅच-अप' मुळे शिवम दुबेला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. सूर्या म्हणाला, "जेव्हा आम्ही पाहिले की एका बाजूने राशिद खान गोलंदाजी करत आहे, तेव्हा शिवम दुबे त्या मॅच-अपसाठी योग्य पर्याय होता. जरी मी मागच्या मॅचमध्ये ५० किंवा १०० धावा केल्या असत्या आणि टीमला हा बदल हवा असता, तरीही हाच निर्णय योग्य ठरला असता."

सामन्यादरम्यान हृदयाचे ठोके वाढले

मुकाबल्यादरम्यान आपण खूप नर्वस होतो, हे सूर्याने मान्य केले. तो हसत म्हणाला, "मी खूप नर्वस होतो. जर कोणी माझे हार्ट रेट चेक केले असते, तर ते १६०-१७५ पर्यंत असते. पण हा खेळाचाच एक भाग आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT