पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या घरात कंटेस्टेंटला जर कुठली भीती वाटत असेल तर ती आहे – बेघर होण्याची. (Bigg Boss 16) घरात राहण्यासाठी कंटेस्टेंट भांडणापासून ते प्रत्येक टास्क चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. गौतम विज, शालीन भानोच, सौंदर्या शर्मा आणि टीना दत्ता यांची नावे या आठवड्यात बिग बॉस १६ मधून बाहेर पडण्यासाठी पुढे आली आहेत. आता गौतम विजला घरातून बेदखल केल्याचे वृत्त आहे. (Bigg Boss 16)
या आठवड्यात बाहेर काढण्यात आल्याने सौंदर्याचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. सोशल मीडियावर अशी अटकळ बांधली जात आहे की सौंदर्या शर्माला घरातून काढून टाकले जाऊ शकते. पण जी बातमी समोर आली ती खूपच आश्चर्यकारक आहे. वास्तविक गौतम विजला बेघर व्हावे लागले आहे. त्याचा बिग बॉस १६ चा प्रवास संपला आहे.
गौतमची बिग बॉस १६ ची सुरुवात खूप चांगली झाली होती. त्याची सौंदर्यासोबतची जवळीकही चर्चेत होती. पण जेव्हा करण जोहर वीकेंड का वार मध्ये पोहोचला. तेव्हा त्याने सांगितले की सौंदर्यासोबतची त्याची जवळीक फक्त कॅमेरापुरती आहे, तो फक्त दिखावा करत आहे. त्यानंतर त्याचा खेळ बिघडला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीना दत्ता आणि गौतम विज यांना सर्वात कमी मते मिळाली आहेत. या कमी मतांच्या आधारे टीना दत्ता काही काळ शोचा भाग राहू शकते, असे म्हटले जात आहे. तर प्रियांका चौधरी, अब्दू रोजिक आणि अर्चना गौतम यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.