पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरही सोशल मीडिया स्टारही आहे. अवनीत तिच्या फॅशन सेन्समुळेही नेहमीच चर्चेत असते; पण आता ती खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अवनीतच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
एका मुलाखतीत अवनीतने लग्नाबाबत वक्तव्य केले आहे. अवनीत म्हणाली की, नेहमीच मला लग्नाबाबत विचारले जाते. मला नाही माहीत, चाहते माझ्या लग्नाबद्दल एवढी चिंता कशासाठी करत आहेत? मी तुम्हाला सांगते, माझ्या लग्नाला फार वेळ आहे. त्यामुळे शांत राहा आणि वाट पाहा. मला लव्ह मॅरेजवर विश्वास आहे. पण आई-वडिलांचे आशीर्वाद मिळाले, तर अॅरेंज आणि लव्ह मॅरेज करेन. मला असेच लग्न करायचे आहे, आणि नाही झाले तर एका कोपर्यात बसून मी एकटी रडेन.
काही दिवसांपूर्वी अवनीत हिचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली होती. तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये अवनीत चाहत्यांना अंगठी दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसली. यामुळे अवनीतने कोणालाही न सांगता साखरपुडा केल्याची चर्चा होती. अवनीतचे गेल्या काही दिवसांपासून नाव राघव शर्मासोबत जोडले जाते.
हेही वाचा