TMC Crisis: पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यावर ममतांचे एक एक शिलेदार त्यांच्याविरूद्ध बंडखोरी करू लागले आहेत. आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील बंडोखोरी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या २८ पैकी २० खासदारांनी वेगळा गट स्थापनेचा आणि एनडीएमध्ये सामील होण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं या पत्रावर कोणी स्वाक्षरी केल्या आहेत हे अजूनपर्यंत गुलदस्त्यात होतं. मात्र आता या बंडखोरींची यादीच माध्यमांच्या हाती लागली आहे.
या यादीत युसूफ पठाण आणि सयानी घोष यांची नावे वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सयानी घोष ही कट्टर भाजपविरोधी आणि ममता प्रेमी असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून ती भासवत होती. युसूफ पठाणला देखील ममतांच्या कृपादृष्टीमुळेच खासदारकी मिळाली होती. दरम्यान, २० पैकी १९ बंडखोरांची जणांची यादी जाहीर झाली असून या सर्वांनी १८ मे रोजी हे पत्र दिलं आहे. या बंडखोरांचे नेतृत्व काकोली घोष दस्तीदार या करत आहेत.
तृणमूल काँग्रेस ही २८ खासदारांसह तिसरी सर्वात मोठी विरोधी पार्टी होती. काँग्रेसकडे ९९ तर समाजवादी पक्षाकडे ३७ खासदार आहेत. त्यानंतर तृणमूलचे २८ खासदार असून आता त्यांच्यात बंडाळी माजली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोरांची संख्या ही १९ असून ती पक्षाच्या एकूण खासदारांच्या दोन तृतियांश इतकी आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कायदा लागू होत नाही. या बंडखोरांनी एनडीएमध्ये सामील होणार नाही मात्र ते त्यांना पाठिंबा देऊ शकतात अशी भूमिका घेतली आहे.
काकोली घोष दस्तीदार
शताब्दी दोय
बपी हलदार
शर्मिला सरकार
शर्मिला बंडोपाध्याय
जगदीश बर्मा बासुनिया
असित कुमार मल
अरूण चक्रवर्ती
रिचा बॅनर्जी
सयानी घोष
खलीलूर रहमान
अबू ताहेर खान
युसूफ पठाण
मिताली बैग
माला रॉय
कालीपदा सोरेन
दीपक अधिकारी
जून मालिया
पार्थ भौमिक
तृणमूल काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बंडखोरी ही आमदारांनी केली असून निलंबीत आमदार रितब्रत बॅनर्जी यांनी दावा केला की ८० पैकी ५८ आमदारांनी त्यांना विरोधीपक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या पक्षातील बंडखोरीला सामोऱ्या जात आहेत. भाजपने तृणमूलची १५ वर्षांची सत्ता हिसकावून घेतली असून पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये कमळ उमललं आहे. विशेष म्हणजे राज्य सभेतील खासदार देखील एका पाठोपाठ एक राजीनामे देत आहेत.