राष्ट्रीय

शपथविधी समारंभाचे निमंत्रण विरोधकांना नाही : जयराम रमेश

दिनेश चोरगे
नवी दिल्ली,पुढारी वृत्तसेवा : नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या रविवारी होणार्‍या शपथविधी समारंभाचे निमंत्रण विरोधी इंडिया आघाडीला देण्यात आलेले नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी शनिवारी येथे दिली. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
काँग्रेसच्या माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते आणि मान्यवरांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार्‍या या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आम्हाला अजूनही निमंत्रण मिळालेले नाही. जर ते मिळालेच, तर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले.
 हेही वाचा :
SCROLL FOR NEXT