नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशातील काही राज्यांमध्ये कोरोना महामारी पुन्हा तोंड वर काढत आहे. अशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. बुधवारी दिवसभरात १ हजार ७ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २६ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. गुरुवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२३ टक्के नोंदवण्यात आला. देशातील एकूण ४ कोटी २५ लाख ६ हजार २२८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. देशात ११ हजार ५८ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर १.२१ टक्के नोंदवण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ५ लाख २१ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८६ कोटी २२ लाख ७६ हजार ३०४ डोस लावण्यात आले आहेत. यातील २.३६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील मुलांना लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी २ लाख ७३ हजार ६०५ डोस पैकी २० कोटी ५५ लाख ७५ हजार ८९६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ३ लाख १० हजार १५७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ३४ हजार ८७७ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?