Mann ki Baat File Photo
राष्ट्रीय

Mann ki Bat|ऑपरेशन सिंदूर म्हणजे बदलत्या भारताची प्रतिमा

'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

Operation Sindoor New India Image

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ लष्करी कारवाई नाही तर बदलत्या भारताची प्रतिमा आहे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाचे उच्चाटन केलेच पाहिजे अशी प्रतिज्ञा घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय सैन्याचेही विशेष कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, सशस्त्र दलांनी दाखवलेल्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे. आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे, हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे. आपल्या सैन्याने ज्या स्पष्टतेने आणि अचूकतेने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. 'ऑपरेशन सिंदूर'ने जगभरातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नवा आत्मविश्वास आणि उत्साह दिला आहे. या लढाईत आमच्या सैनिकांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, हे त्यांचे अदम्य धैर्य होते आणि त्यात भारतात बनवलेल्या शस्त्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची ताकद समाविष्ट होती. या विजयात आमचे अभियंते, तंत्रज्ञ अशा अनेकांचा सहभाग आहे, असेही ते म्हणाले.

'ऑपरेशन सिंदू बदलत्या भारताचे चित्र'

पंतप्रधान म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे आणि या चित्राने संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनांनी भरले आहे आणि तो तिरंग्यात रंगवला आहे.' तुम्ही पाहिले असेल की देशातील अनेक शहरे, गावे आणि लहान शहरांमध्ये तिरंगा यात्रा काढल्या जात होत्या. हजारो लोक हातात तिरंगा घेऊन देशाच्या सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी बाहेर पडले.

'ऑपरेशन सिंदूर अनेक कुटुंबांच्या जीवनाचा एक भाग बनले'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सोशल मीडियावर कविता लिहिल्या जात आहेत, संकल्पगीते गायली जात आहेत. लहान मुले अशी चित्रे काढत होती ज्यात मोठे संदेश लपलेले होते. मी ३ दिवसांपूर्वीच बिकानेरला गेलो होतो. तिथल्या मुलांनी मला असेच एक चित्र भेट दिले. 'ऑपरेशन सिंदूर' ने देशातील लोकांवर इतका प्रभाव पाडला आहे की अनेक कुटुंबांनी हे ऑपरेशन त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. बिहारमधील कटिहार, उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि इतर अनेक शहरांमध्ये त्या काळात जन्मलेल्या मुलांचे नाव 'सिंदूर' असे ठेवण्यात आले, असेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT