rohini acharya post
"काल मला शिवीगाळ करण्यात आली आणि सांगितले गेले की मी घाणेरडी आहे आणि मी माझ्या वडिलांना माझी घाणेरडी किडनी मिळवून दिली. यासाठी कोट्यवधी रुपये आणि तिकिटे लागली आणि नंतर मी घाणेरडी किडनी बनवली. मी सर्व विवाहित मुली आणि बहिणींना सांगू इच्छिते की, जेव्हा तुमच्या आईवडिलांच्या घरात मुलगा किंवा भाऊ असेल तेव्हा देवासारखा असलेल्या तुमच्या वडिलांना चुकूनही वाचवू नका. तुमच्या भावाला, त्या घरातील मुलाला, तुमची किंवा हरियाणवी मित्राची किडनी घेण्यास सांगा.", अशी धक्कादायक पोस्ट लालू प्रसाद यावद यांची मुलगी रोहिणी आचार्य केली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर मुलगी रोहिणी आचार्य एकामागून एक गंभीर आरोप करत आहे. एका तासातच तिने तिच्या दुसऱ्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.
विधानसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. रोहिणी आचार्य यांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं की, काल एका मुलीचा, एका बहिणीचा, एका विवाहित महिलेचा आणि एका आईचा अपमान करण्यात आला, त्यांना घाणेरडे शिवीगाळ करण्यात आली आणि तिला मारण्यासाठी चप्पल वापरण्यात आली. मी माझा स्वाभिमान गमावला नाही, मी सत्य सोडले नाही आणि म्हणूनच मला हा अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने, जबरदस्तीने, तिच्या रडणाऱ्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडले."
रोहिणी आचार्य यांनी एका तासात दुसरी पोस्ट करत यामध्ये म्हटलं की, "त्यांनी मला माझ्या पालकांच्या घरातून हिसकावून घेतले. त्यांनी मला अनाथ केले." तुमच्यापैकी कोणीही कधीही माझ्या मार्गावर येऊ देऊ नका, कोणत्याही कुटुंबाला रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण नसावी. काल मला शिवीगाळ करण्यात आली आणि सांगितले गेले की मी घाणेरडी आहे आणि मी माझ्या वडिलांना माझी घाणेरडी किडनी मिळवून दिली. यासाठी कोट्यवधी रुपये आणि तिकिटे लागली आणि नंतर मी घाणेरडी किडनी बनवली. मी सर्व विवाहित मुली आणि बहिणींना सांगू इच्छिते की, जेव्हा तुमच्या आईवडिलांच्या घरात मुलगा किंवा भाऊ असेल तेव्हा देवासारखा असलेल्या तुमच्या वडिलांना चुकूनही वाचवू नका. तुमच्या भावाला, त्या घरातील मुलाला, तुमची किंवा हरियाणवी मित्राची किडनी घेण्यास सांगा. सर्व बहिणी आणि मुलींनी त्यांच्या पालकांची काळजी न करता स्वतःच्या कुटुंबाची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या कामाची आणि त्यांच्या सासरच्यांची काळजी घ्यावी. फक्त स्वतःचा विचार करा."
"माझ्या कुटुंबाला, माझ्या तीन मुलांना न भेटून मी एक मोठे पाप केले आहे. मी माझे मूत्रपिंड दान करताना माझ्या पतीची किंवा सासरच्यांची परवानगी घेतली नाही. माझ्या देवाला, माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी, मी आज जे घाणेरडे म्हणून लेबल केले आहे ते केले. तुम्ही सर्वांनी, माझ्यासारखी चूक कधीही करू नका. रोहिणीसारखी मुलगी कोणालाच होऊ देऊ नका.", असेही रोहिणी आचार्य यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य यांनी शनिवारी (दि. १६) राजकारण सोडत असल्याचे तसेच आपल्या कुटुंबाचाही त्याग करत असल्याची घोषणा केली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, "माझे कुटुंब नाही. तुम्ही तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांना विचारले पाहिजे. त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढले आहे. ते कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार देतात. संपूर्ण देश विचारत आहे की पक्ष इतका वाईट का अपयशी ठरला. जर तुम्ही संजय यादव आणि रमीज यांची नावे घेतली तर तुमचा अपमान केला जातो, त्यांना बाहेर काढले जाते आणि शिवीगाळ केली जाते."
बिहारमधील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षी मे महिन्यात लालू प्रसाद यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांना पक्षातून बाहेर काढण्यात आल्याने रोहित आचार्य नाराज होत्या.मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या तेजस्वी यादव यांच्यासाठी प्रचार करताना दिसल्या. बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, त्यांच्या जागांची संख्या ७५ वरून फक्त २४ वर आली, तर महागठबंधन युतीला फक्त ३५ जागा मिळवता आल्या.
दरम्यान, आचार्य यांनी राजकारण सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर भाजपने राजद आणि लालू यादव यांची टीका केली आहे. लालूप्रसाद यादव हे पितृसत्ताक आणि महिलाविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. भाजप नेते अमी मालवीय यांनी आरोप केला की, किडनी दान करूनही रोहिणी आचार्य यांना बाजूला करण्यात आले. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी तेजस्वी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली.