File Photo
राष्ट्रीय

IndiGo Chaos : ५०० किमी अंतरासाठी विमान प्रवास ७,५०० रुपयांपर्यंत, 'इंडिगो'च्या गोंधळामुळे केंद्राने निश्‍चित केला दर

विमान प्रवास दरात कोणतीही वाढ आढळल्यास त्वरित कारवाई कंपनींना दिला इशारा

पुढारी वृत्तसेवा

Centre fixes flight fare

नवी दिल्ली: इंडिगो एअरलाईन्सच्या विस्‍कळीत झालेल्‍या सेवेनंतर विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. आता केंद्र सरकारने सर्व एअरलाईन्सना नव्याने निश्चित केलेल्या भाड्याच्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) निर्धारित नियमांमधून भाड्याच्या दरात कोणतीही वाढ आढळल्यास त्वरित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

हवाई भाड्याबद्दलच्या तक्रारींची मंत्रालयाने घेतली गंभीर दखल

नागरी उड्डाण मंत्रालयाने निर्देशात म्हटले आहे की, "सध्याच्या गोंधळामुळे काही एअरलाईन्सद्वारे आकारल्या जाणाऱ्या हवाई भाड्याबद्दलच्या तक्रारींची नागरी उड्डाण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे... आता निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देणारे अधिकृत निर्देश सर्व एअरलाईन्सना जारी करण्यात आले आहेत."

सरकारकडून देशभरात भाडे मर्यादा लागू

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला स्थिर करण्यासाठी केंद्राने आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्देश जारी केले आहेत, सर्व विमान कंपन्यांना नवीन निश्चित केलेल्या कमाल भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होणे, क्षमतांची तीव्र कमतरता आणि प्रवाशांच्या व्यापक त्रासानंतर "जनहितासाठी" ही आपत्कालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. आदेशानुसार, सरकारने अंतर स्लॅबवर आधारित देशांतर्गत इकॉनॉमी-क्लास भाड्यावर तात्काळ देशव्यापी मर्यादा लागू केली आहे :

  • ५०० किमी पर्यंत: ७,५०० रुपये

  • ५००-१००० किमी: १२,०००

  • १०००-१५०० किमी: १५,००० रुपये

  • १५०० किमी पेक्षा जास्त: १८,००० रुपये

बिझनेस-क्लास भाडे आणि RCS-UDAN फ्लाइट्सना सूट

या भाड्याच्या मर्यादेत UDF, PSF आणि कर वगळले आहेत. बिझनेस-क्लास भाडे आणि RCS-UDAN फ्लाइट्सना सूट देण्यात आली आहे.भाडे स्थिर होईपर्यंत किंवा पुढील पुनरावलोकन होईपर्यंत अनिवार्य मर्यादा लागू राहतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, किंमत मर्यादा सर्व बुकिंग चॅनेल, एअरलाइन वेबसाइट, मोबाइल अॅप्स, OTA आणि ट्रॅव्हल पोर्टलवर लागू होतात. विमान कंपन्यांना सर्व भाडे बकेटमध्ये तिकिटांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आणि मागणी असामान्यपणे वाढलेल्या क्षेत्रांमध्ये क्षमता वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंडिगोमधील गोंधळामुळे भाड्यात वाढ

परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत किंमत मर्यादा लागू राहतील, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत, भारतातील सर्वात मोठी बजेट वाहक इंडिगोच्या हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली कारण त्यांना नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांच्या पार्श्वभूमीवर क्रू रोस्टरमध्ये बदल करण्यात अडचण येत होती.प्रवाशांच्या अडचणीत भर पडली ती म्हणजे विमान तिकिटांच्या किमतीत आश्चर्यकारक वाढ, काही मार्गांवर भाड्यात ४ पटीने वाढ झाली. शुक्रवारी इंडिगोची सुमारे जवळजवळ १००० उड्डाणे रद्द करण्यात आली. सर्वत्र गोंधळ सुरू असल्याने, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू सारख्या मेट्रो शहरांमध्ये देशांतर्गत विमान भाडे तिप्पट आणि चौपट वाढले.

आज ५०० इंडिगो उड्डाणे रद्द

शनिवारी, सरकारने इंडिगोला FDTL नियम लागू करण्यापासून तात्पुरती सूट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी, ऑपरेशन्स स्थिर होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे होती. हा अहवाल लिहिण्याच्या वेळी, जवळजवळ ५०० इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आणि विमानतळांवर गोंधळाचे दृश्य कमी झाले. आता विमान सेवा विस्‍कळीत प्रकरण सर्वोच्‍च न्‍यायालयात पोहचले असून, उड्डाणे स्थगित केल्यामुळे प्रवाशांना झालेल्या नुकसानाबद्दल हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT