Latest

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांचा आजपासून पाणी त्याग

मोहन कारंडे

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासंदर्भातील वंशावळीची अट काढून टाकण्याबाबतचा सुधारित जी.आर. राज्य सरकारने काढलेला नसल्याने उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी (दि. ९) जाहीर केला. तसेच आजपासून सलाईन लावून घेणार नाही आणि पाणीही सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

शुक्रवारी रात्री अडीचपर्यंते जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीची माहिती आणि बंद लिफाफा जरांगे-पाटील यांना शनिवारी देण्यात आला. सरकारने जी.आर.मध्ये कुठलाही बदल केलेला नाही किंवा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे आपले उपोषण सुरूच राहील, असे जरांगे-पाटील यांनी जाहीर केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT