वीज पडून झाडाखाली थांबलेल्या दोघा शेतमजूरांचा मृत्यू  File Photo
वर्धा

Wardha : वीज पडून झाडाखाली थांबलेल्या दोघा शेतमजूरांचा मृत्यू

कारंजा (घाडगे) येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : कारंजा (घाडगे) जवळच्या शेत शिवारात वीज पडून दोघा शेतमजूरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घडली. रितेश मोरेश्वर सरोदे (वय २२) आणि राजेश ताराचंद सरोदे (वय १६) अशी मृतांची नावे आहेत.

कारंजा (घाडगे) पासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात कपाशीची लागवड सुरू होती. कारंजा (घाडगे) येथील खर्डीपुरा परिसरातील रहिवासी रितेश सरोदे आणि राजेश सरोदे हे दोघे शेतमजूर शेतात कपाशी लागवडीसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने दोघेही शेतातील झाडाखाली उभे होते. यावेळी अचानक वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास कारंजा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT