नागपूर

Anil Deshmukh : शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही: अनिल देशमुख

अविनाश सुतार
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नुकसान होवून मदत मिळत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालास बाजारात भाव मिळत नाही. कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.  Anil Deshmukh
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अनिल देशमुख व माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल व नरखेड तालुक्यातील  शेतकऱ्यांनी आज (दि. १७)  शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. सध्या विदेशातून मोठया प्रमाणात कापसाची आयात केल्यामुळे कापसाचे भाव पडले आहेत. कापसाला १४ हजार रुपये भाव द्यावा. याच पध्दतीने सोयाबीलला ८ हजार रुपये भाव द्यावा. बांग्लादेशमध्ये विदर्भातील संत्राची निर्यात होते. परंतु, निर्यात कर हा १८ रु. वरुन तो ८८ रु. वर करण्यात आला. यामुळे निर्यात होत नसल्याने संत्राला भाव मिळत नाही. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करावा. मोठया प्रमाणात तुरीची डाळ आयात केल्याने तुरीचे भाव सुध्दा पडले आहेत. Anil Deshmukh
१४ हजार रुपये भाव असलेली तूर आता ७ हजारांवर आली आहे. मोठया प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान होवूनही अद्यापही ४० टक्के शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत.  पीक विमाची मदत देण्यासाठी विमा कंपन्या टाळाटाळ करतात. २० रुपये २५ रुपये ५० रुपये अशी मदत देवून सरकार शेतकऱ्याची चेष्टा करीत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. अनेक शेतकऱ्यांनी गळ्यात संत्रा व कापसाच्या माळा घातल्या होत्या.
विरोधी पक्षात असताना भाजपचे नेते कशा मागण्या करीत होते, याचे व्हिडीओच अनिल देशमुख यांनी यावेळी दाखविले. अनेक व्हिडिओ दाखवून त्यांनी भाजपच्या नेत्यांचा बुरखाच फाडला.

हेही वाचा

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT