कर्जात बुडलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन file photo
चंद्रपूर

चंद्रपूर : कर्जात बुडलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन

करण शिंदे

चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील हरणी शेतशिवारात एका शेतकऱ्याने गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना सोमवारी (दि.12) समोर आली आहे. कर्जामध्ये बुडाल्यामुळे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास जीवनयात्रा संपवली. रामभाऊ नथु गभने (वय.47) असे मृताचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने मोबाईलवरून जीवन संपवणार असल्याची माहिती घटना भावाला दिली होती. अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

नेरी परिसरातील हरणी येथील निवासी रामभाऊ नथु गभने हा शेतकरी सोमवारी (दि.12) स्व:ताच्या शेतावर गेला होता. शेतावर बराचवेळ काम केल्यानंतर तो एकांतपणे बसला होता. गळफास घेन्यापुर्वी त्यांनी स्वतःच्या भावाला भ्रमणध्वनी वरून गळफास घेणार असल्याची माहिती दिली. यानंतर जवळ असलेल्या खुटाळा गावातील शेतावर असलेला भाऊ लगेच हरणी येथील भावाच्या शेतात पोचहला.

त्यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाला रामभाऊ यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिक सडल्याने तो आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती आहे. सदर शेतकऱ्याने शेती कसण्याकरीता कर्ज घेतले होते. त्यामुळे वैफल्यग्रस्त असलेल्या रामभाऊ गभने यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा आप्तपरिवर आहे. सदर शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यता येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT