टिटवाळा : पुढारी वृत्तसेवा : टिटवाळाजवळील उंभारणी पाण्याच्या टाकीजवळ महिलेने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. मात्र या महिलेचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
धृपदा जयराम वाघे ( वय ४० ) यांनी ६ फेबुवारी राेजी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले हाेते. हा हत्येचा प्रकार असल्याचे चर्चा परिसरात हाेती. प्रकरणाची सखोल चैाकशी व्हावी अशी मागणी हाेत हाेती. त्यानंतर कल्याण ता. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
चौकशी दरम्यान धृपदा यांचा बहिण आशा वाघे आणि दीर सुरेश त्र्यंबक वाघे यांच्याशी जमिनीवरून वाद सुरू असल्याची माहिती पाोलिसांना मिळाली. सुरेश वाघे यास पाेलिसांनी ताब्यात घेतले. जमिनीच्या वादातूनच धृपदा हिचा हातानेआवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. संशयित आरोपी सुरेश वाघे याला अटक करण्यात आली आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचलतं का?