कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या 2025 सार्वत्रिक पालिका निवडणुक कार्यक्रमाच्या प्रारूप प्रभाग रचनेतील सूचना व हरकती विचाराधीन घेऊन चार प्रभागाची व्याप्ती व सीमांकनात बदल करीत शासनाने हिरवा कंदील देत मान्यता दिल्याने पालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्याचे घोषित केले. त्यामुळे निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने पालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्याने पालिकेतून 27 गावे वगळण्याची 27 गाव संघर्ष समितीच्या मागणीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी 2025 सावित्री पालिका निवडणुकीसाठी 122 सदस्य निवडण्यासाठी चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक घेतली जाणार असल्याने चार सदस्यीय 29 पॅनल तर तीन सदस्याचे दोन पॅनल असे 31 पॅनलच्या निवडणुकी साठी प्रारूप प्रभाग रचना ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आली होती. या प्रारूप प्रभाग रचनेवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तसेच इच्युक उमेदवारांच्या अश्या एकूण 264 सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.
या मध्ये विविध प्रभागातील इमारती बाजूच्या प्रभागाला जोडण्यात आल्याने अनेकांनी प्रभागाच्या सीमांकना बाबत हरकती घेतल्या होत्या. या हरकती व सूचना वर राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी यांनी सुनावणी घेतल्या नंतर प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात एकाच प्रकरच्या प्रभागाच्या हद्दी संदर्भात 214 हरकती त्या मध्ये प्रभाग क्रमांक 6,7 ,23 व 25 या पॅनल मधील 4 हरकती प्रभागाची व्याप्ती व प्रभाग सीमांकना बाबत विचाराधीन घेऊन या अश: बदल केला तसेच अन्य 46 सर्व सामान्य हरकती, आरक्षण संदर्भातील मुद्दे जे मुद्दे प्रभाग रचनेशी संदर्भीत नव्हत्या.
त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रभाग रचनेला मान्यता दिल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी दिली. शासनाने मंजुरी दिलेल्या अंतिम प्रभाग रचना केडीएमसीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असून पालिका मुख्यालयात प्रभाग रचनेचे नकाशे व परिशिष्ट 14,15 संदर्भात प्रभागाची व्याप्ती बाबत पाहण्यासाठी पालिकेच्या प्रभागक्षेत्र कार्यालयात अंतिम वार्ड रचना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
27 गावे वगळली जाण्याचा प्रश्न अधांतरिच
27 गावे वगळली जाण्याचे पालिकेतील आगामी निवडणुकीतून 27 गावे वगळण्याची मागणी 27 गाव संघर्ष समितीने केली होती मात्र शासनाने पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला मान्यता देत अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्याने पालिकेच्या निवडणुकीतून 27 गावे वगळली जाण्याचा प्रश्न आधारितच राहिला आहे.