विटा, पुढारी वृत्तसेवा : विटा शहर आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर रब्लिंग पट्टे (वेगरोधक) बसवावेत, या मागणी साठी झालेल्या आंदोलनामध्ये कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. येत्या पंधरा दिवसात शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर असे वेगरोधक बसवले नाहीत तर यापेक्षा आक्रमक आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
विटा शहरात आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते चांगले झाले आणि त्यामुळे वाहनांचे वेग वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत शहरातील सर्व रस्त्यांवर राबलिंग पट्टे म्हणजे वेगरोधक बसवा तसेच शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरील शाळा, महाविद्यालय तसेच प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने स्थानिक रहिवासी आणि नागरिक करीत आहेत. परंतु प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी हा विषय चांगलाच लावून धरला आहे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली सका ळी ११ वाजता विटा ते कराड रस्त्यावर नेरी नाका परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्का बुक्की झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तासाभराच्या रास्ता रोकोमुळे खानापूर आणि कराड मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाच्या जोरावर हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मोहिते यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी झटापट केली.
मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवतीकडे केले. त्यावर पोलिसांनी बळाचा वापर करत काही कार्यकर्त्यांना उचलून पोलीस गाडीत घालून नेण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणा बाजी देत गर्दीतून पुढे येणारी वाहने पुन्हा मागे ढकलली. हा प्रकार तब्बल दोन तास सुरू होता त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादा वादी झाली. परिणामी तणाव निर्माण झाला होता.
त्यानंतर नायब तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी शंकर मोहिते, विनोद पाटील, संग्राम माने, विनायक भिंगारदेवे आदींसह ६० ते ७० जण उपस्थित होते. दरम्यान येत्या चार दिवसात सर्व प्रमुख मार्गांवर वेगरोधक बसवण्यात येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मोहिते यांच्यासह संग्राम माने, विनोद पाटील, विवेक भिंगारदेवे, दिपक शितोळे, राजेंद्र पाटील, तेजस मोहिते, देविदास जाधव यांच्यासह विटा शहर आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
हे ही वाचलं का