कळंबोली (रायगड) : पुढारी वृत्तसेवा : येथे असणाऱ्या एसएससी सिमेंट कंपनीमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांवर आज ( दि.१८) सकाळी कळंबोली पोलिसांनी लाठीचार्ज केला.५ ते ७ माथाडी कामगार किरकोळ जखमी झाले असून, या घटनेचा माथाडी कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे.
ठेकेदार आणि पोलीस संगनमताने माथाडी कामगारांच्या पोटावर पाय आणत असल्याचा आराेप यावेळी माथाडी कामगारांनी केला. रेल्वे माथाडी बोर्डाची कुठलीही परवानगी नसताना परप्रांतीय कामगारांचा ठेकेदार भरणा करत असल्याच्या विरोधात मूळ माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. उपाशी मरण्यापेक्षा न्याय मिळाला नाही तर ठेकेदार आणि पोलीस प्रशासनाच्या दडपशाही विरोधात आत्मदहनाचा इशारही माथाडी कामगारांनी दिला आहे.
हेही वाचा :