पुणे

कोरोनाचे संकट जाऊ दे; दोन वर्षांनंतर देहूत दाखल झालेल्या वारकर्‍यांचे साकडे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जगावर आलेले कोरोनाचे संकट जाऊ दे… संपूर्ण जगात शांतता, सुख आणि सुदृढ आरोग्य मिळू दे… असे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, असे सांगत होते परभणीचे वारकरी लक्ष्मणबुवा शिंदे. गेली दोन वर्षे पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते. दोन वर्षे वारकर्‍यांना पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नाही.

यासंदर्भातील वारकर्‍यांचे अनुभव आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी वारकर्‍यांशी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने संवाद साधला. या वेळी दोन वर्षे पालखी सोहळ्यात सहभागी होता न आल्यामुळे दुख: होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यंदा वारी सोहळा साजरा करता येत असल्यामुळे वारकर्‍यांनी शासनाचे आभार मानले. त्याचबरोबर आनंद देखील व्यक्त केला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT