पुणे

.. तर हा विषयच राहिला नसता : खासदार उदयनराजे भोसले यांचे मत

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे आरक्षण वाढवण्याचा निर्णय राज्यपातळीवर घेण्यात आला, त्याच धर्तीवर राज्यातही आरक्षण वाढवण्यात आले तर आरक्षणाचा मुद्दा कोणत्याही समाजाला न दुखावता सुटू शकतो. मंडल आयोग जाहीर केला, त्याचवेळी सगळे केले असते तर विषयच राहिला नसता असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. राज्यस्तरीय नियोजन समितीची उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पुणे विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक झाली. सातार्‍यातील आढावा बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अशी परिस्थिती का झाली याचा विचार करावा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. ज्यावेळी आपल्याला लोकांची मान्यता असते, त्यावेळी लोकांचा आदर केला पाहिजे. कारण देशात लोकशाही आहे. परिस्थिती बदलत असते. अशी परिस्थिती का झाली याचा विचार त्या पक्षाने केला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना लगावला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT