कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे उन्ह वाढल्याने पर्यटनस्थळांवरही याचा परिणाम जाणवत आहे. शनिवारवाड्यासह लालमहाल, नाना वाडा, पाताळेश्वर लेणी या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कायम गजबजलेला शनिवार वाडा दुपारच्या वेळेत सुनासुना दिसू लागला आहे. लालमहाल, नाना वाडा ही स्थळे पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांची संख्या घटली आहे.
जगभरातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने शनिवारवाड्याला भेट देत असतात. ऐतिहासिक वास्तू असलेला हा शनिवारवाडा पाहण्यासाठी एरवी गर्दी असते. दिल्ली दरवाजा प्रमुख गेटवर तिकीट काढण्यासाठी भलीमोठी रांग लागते. मात्र वाढत्या उन्हामुळे पर्यंटक घराबाहेर निघणे टाळत आहेत. पर्यटक घटल्याने परिसरातील हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
शनिवारवाडा परिसरात दोन्ही बाजूस वाहने उभी असतात. मात्र गत आठवड्यापासून हा परिसर रिकाम असल्याचे दिसते. पर्यटकाअभावी शनिवारवाड्यासमोर पटांगणात शुकशुकाट दिसत आहे. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.
– बी. टी. कवडे, बुकिंग इन्चार्ज, शनिवारवाडा
हेही वाचा