आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले : देवेेंद्र फडणवीस | पुढारी

आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले : देवेेंद्र फडणवीस

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती शरद पवारांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला जमले नाही; पण वर्ध्यातून शरद पवारांनी पंजा गायब करून दाखवला. आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले. त्यामुळे आपण सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यात बुधवारी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे वर्ध्यातून रामदास तडस आणि अनुप धोत्रे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. महात्मा गांधींचे वर्धा ना काँग्रेसचे, ना शरद पवारांचे. वर्धा भाजपचे आहे, नरेंद्र मोदींचे आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले असल्याचे ते वर्ध्यात म्हणाले, तर अकोल्यात बोलताना त्यांनी वंचितांना खर्‍या अर्थाने ‘वंचित’ने साथ दिली नसून, मोदी यांनी साथ दिली आहे, असे म्हटले.

Back to top button