कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा
आषाढी वारी तोंडावर आली आहे. कोरोना निर्बंध हटविल्याने यंदा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे; परंतु पालखी पुण्यात आल्यावर वारकरी निवासांच्या स्थानी मेट्रोची कामे सुरू असल्याने वारकरी नेमके उतरणार कुठे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
महापालिका त्यांना पर्यायी जागा देणार आहे का असा सवाल पालखीचे स्वागत करणार्या मंडळाच्या पदाधिकार्यांनी महापालिकेला केला आहे. शनिवार पेठेतील वर्तक उद्यानाजवळील नदीपात्रातील रस्तावर, धोबीघाटा पुढील जागेत, मंडई परिसरातील महात्मा फुले मंडई जवळ मेट्रोचे कामे सुरू आहे. डेक्कन परिसरातील पुलाची वाडीपासून ते शिवाजीनगर कोर्ट पर्यंतच्या नदीपात्रातील जागेत अनेक वारकरी तंबू ठोकून विसावा घेत असतात. मात्र यावर्षी नदीपात्रातील मेट्रोच्या कामांमुळे नदीपात्रात मोठ-मोठ्या मशिन-साहित्याने नदीपात्र परिसर व्यापला आहे. त्यामुळे वारकर्यांना यंदा तंबू बांधता येणार नाहीत.
शहरात प्रत्येक रस्त्यावर चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापले आहेत. रात्रीच्या वेळीस अनेक चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे दिंडीबरोबर येणारे ट्रक, यांची भर पडणार त्यामुळे वारकरी आपल्या गाड्या यावर्षी लावणार कुठे वारकर्यांना किमान मूलभूत सुविधा पुरवून त्यांची वारी सुखद करण्याचा दरवर्षी प्रशासनाचा प्रयत्न असतो त्यामुळे महापालिका त्यांना पर्यायी जागा देणार आहे का? असा सवाल स्थानिकांकडून होत आहे.