सिडको : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी गावात दोन ते तीन दिवसांपासून वानराने ठाण मांडले आहे. दिवसभर वानर गावात उड्या मारत फिरत असल्याने लहान मुलांमध्ये भीती पसरली आहे.
विल्होळी गावात ठाण मांडून बसलेले हे वानर गावात एका घराच्या छपरावरून दुसऱ्या घरावर उडी मारणे, रस्त्याने जाणारे नागरिक व लहान मुले यांच्या हातातील वस्तू पळविणे तसेच घराबाहेरील वस्तू उचलत आहे. यामुळे लहान मुलांसोबतच नागरिकांमध्ये भीती पसरली असून, वनविभागाने वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा :