उत्तर महाराष्ट्र

नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी

अंजली राऊत

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेल्या लालपरीच्या मागील भागातील चारपैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकांवर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरीजवळ निदर्शनास आली. सुदैवाने या बसला कुठलाही अपघात न झाल्याने बसमधील जवळपास ३५ प्रवाशांचा जीव वाचला आहे.

इगतपुरीजवळ महामार्गावरून ही बस धावत असताना अन्य एका वाहनधारकाने या बसला ओव्हरटेक करून बसचालकाला याबाबत सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर बस महिंद्रा कंपनीजवळ थांबवण्यात आली. या घटनेनंतर एसटी बस (क्र. एमएच15, बीटी 4129) चालविणाऱ्या चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. अकोलेहून कसाराकडे येताना अनेक ठिकाणी वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदार कारभारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. प्रवाशांचे देव बलवत्तर म्हणून सुदैवाने ही घटना उघडकीस आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर इगतपुरी आगारातून नवीन टायर आणून बसला बसवून ही एसटी बस कसाऱ्याकडे सोडण्यात आली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT