नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
ठाणगाव येथे उंबरदरी लोकवस्तीकडे जाणारा पूल अतिशय धोकादायक झाला आहे. अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी मागणी स्वराज्य संघटना, जनसेवा सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्यांनी केली आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिले आहे.
उंबरदरी लोकवस्तीवर शेकडो लोक राहतात व रोज या पुलावरून ये-जा करत असतात. या पुलावर सुमारे 6-7 महिने पाणी असते. पुलाची मागील काही वर्षांपूर्वीच दुरवस्था झालेली आहे. ही बाब पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्याचा उपयोग झाला नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यावर्षी पूल अतिशय धोकादायक झालेल्या आहे. पुलाचे फाउंडेशन उखडले असून, लोकांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. पुराच्या पाणी तेथील लोकांना त्या पुलावरून पुलावरून वाहत असल्याने ये-जा करणे शक्य नाही. या भागात बागायती शेती केली जाते. मात्र, शेतकर्यांना शेतमाल डोक्यावरून वाहून न्यावा लागतो. या पुलावर फक्त मोटारसायकल जाते. अवजड वाहने जाऊ शकत नाही, त्यामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात मोहन शिंदे, सुदाम शिंदे, पवन शिंदे, पांडुरंग शिंदे, दत्तात्रेय शिंदे, शिवाजी शिंदे, रामदास शिंदे, किसन शिंदे, मनोज शिंदे, दामोदर शिंदे, एकनाथ शिंदे, राहुल शिंदे, काशीनाथ शिंदे आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी घरे असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याने त्यांनी पुलाची मागणी केली आहे. खासदार गोडसे यांना निवेदन देऊन पूल बांधण्याची मागणी स्वराज्य संघटनेचे योगेश शिंदे, जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांनी केली आहे. लवकरच पाटबंधारे खाते यांच्याशी पत्रव्यवहार करून या पुलाची मागणी केली जाणार असल्याचे शिंदे, भोर यांनी सांगितले.
स्थानिकांची गैरसोय :
यावर्षी अतिवृष्टीमुळे या पुलावर जवळपास एक महिनाभर पुराचे पाणी होते. स्थानिक लोकांना गावामध्ये येण्यासाठी आठ ते नऊ किलोमीटर अंतर पार करून यावे लागते. या पुलावर पाणी असल्याने स्थानिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते.