उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्याच्या कडेला बसलेल्या तरुणीचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 29) सकाळी 7.30च्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (22) असे मृत तरुणीचे नाव आहे.

आंधळे कुटुंबीय सध्या मुंबई येथे स्थायिक असून सोनल ही कुटुंबासोबत आतेभावाच्या लग्नासाठी चार-पाच दिवसांपूर्वी खंबाळे येथे आली होती. दोन दिवसांपूर्वी आतेभावाचा विवाह सोहळा आटोपला. पाहुणे गेल्यानंतर दोन-तीन दिवसांत भाऊसाहेब आंधळे व कुटुंबीय मुंबईला परतणार होते. रविवारी सकाळी कुटुंबाचे काही सदस्य शेततळ्यात पाणी पाहायला गेले होते, त्यावेळी सोनल शेततळ्याच्या कडेला बसून होती. सर्व सदस्य घरी परतले, मात्र सोनल घरी आली नाही. त्यामुळे आंधळे कुटुंबीयांनी चौकशी केली. 8.30 च्या सुमारास शेततळ्यात सोनलचा मृतदेह तरंगताना आढळला. या दुर्दैवी घटनेने खांबाळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तिच्या नातेवाइकांनी सोनलला उपचारांसाठी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.  सोनलने नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते असे समजते. सायंकाळी शोकाकुल वातावरणात खंबाळे येथे सोनलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील, चुलते, चुलती, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT