जळगाव, पुढारी वृत्तसेवा : घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या भाग्यश्री मुकेश मोरे (वय-२५) हिचा विवाह उल्हासनगर ठाणे येथील मुकेश आत्माराम मोरे याच्याशी झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर पती मुकेश याने अपार्टमेंटमध्ये घर घेण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. पतीने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासरे, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी देखील पैशासाठी तगादा लावला.दरम्यान, या त्रासाला कंटाळून भाग्यश्री मोरे आपल्या माहेरी निघून गेली.
शुक्रवार (दि.८) रोजी भाग्यश्री मोरे हिने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती मुकेश आत्माराम मोरे, सासरे आत्माराम मोरे, सासू सुशिलाबाई आत्माराम मोरे, दीर राजेश आत्माराम मोरे ( रा. उल्हासनगर, ठाणे ) नणंद ज्योती सुशील मिस्तरी ( रा. उधना सुरत) आणि मेघा गोकुळ मिस्त्री ( रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस भरत लिंगायत करीत आहे.
हेही वाचलं का