Water Tanker Pudhari File photo
अहिल्यानगर

Ahilyanagar Water Tanker Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर; 111 गावे बाधित, 107 टँकर सुरू

उन्हाच्या तडाख्यामुळे व भूजलपातळी घटल्याने पाणी संकट तीव्र; शेवगाव-जामखेडसह अनेक तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर: उन्हाचा तडाखा आणि भूजलपातळीत दिवसेंदिवस होत असलेल्या घटमुळे जिल्ह््यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शेवगाव व जामखेड या दोन तालुक्यांनादेखील पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच या दोन्ही तालुक्यांत टँकर सुरू झाले आहेत. दरम्यान, जिल्हाभरात आजमितीस 111 गावे आणि 650 वाड्यांत पाणीटंचाई असून, येथील 1 लाख 99 हजार 435 लोकसंख्येला 107 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपर्यंत अकोले, संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी व कर्जत, नेवासा या सात तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने या गावांतील जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आता शेवगाव तालुक्यातील 4 गावे आणि 14 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रांताधिकाऱ्यांनी चार टँकर सुरू केले आहेत. जामखेड तालुक्यातील 3 गावे आणि 3 वाड्यांतील साडेसात हजार लोकसंख्येसाठी 4 टँकर धावत आहेत.

सध्या पारनेर तालुक्यात टंचाई परिस्थिती अधिक असून या तालुक्यात 36 टँकर सुरू आहेत. संगमनेर तालुक्यात 20, नगर तालुक्यात 15, पाथर्डी तालुक्यात 13, कर्जत तालुक्यात 11, शेवगाव व जामखेड तालुक्यांत प्रत्येकी 4, अकोले तालुक्यात 3 तर नेवासा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT