पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या माहिम येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरुण मिठी नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री माहिम खाडीवर उभे असताना, एका मित्राचा पाय घसरल्याने, तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसरऱ्याने धाव घेतली असता तोही वाहून गेला. मध्यरात्री भरती असल्याने अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आले नाही. मात्र, पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला तर दुसऱ्या मित्राचा शोध सुरु आहे. जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत. (मिठी नदी)
कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहिम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही जवळच असलेल्या माहिमच्या खाडीवर गेले. मध्यरात्री घरी जात असताना, शौचाला जाण्यासाठी दोघेही खाडीजवळ गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. या घटनेबद्दल अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. परंतु मध्यरात्री मुसळधार पाऊस असल्याने अग्निशमन दलाला बचावकार्य करता आले नाही. पहाटे पाणी ओसरल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी एका तरुणाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला. तर दुसऱ्या मित्राचा शोध अद्याप सुरु आहे. (मिठी नदी)
हेही वाचा