मुंबई

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपकडून षडयंत्र : संजय राऊत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र भाजप करत आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपवर त्यांनी हा आरोप  केला. काय चालू आहे महाराष्ट्रात? दिल्लीत जाण्याएवढं काय झालंय महाराष्ट्रात? असा सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भाजप नेते दिल्लीला गृहसचिवांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यावर बोलत असताना राऊत म्हणाले की, भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची आधी भेट घ्यावी.  मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला, राणा दाम्पत्यांवर आक्रमक झालेले शिवसैनिक, किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला या सर्व घटना पाहता कायदा व सुव्यवस्था अस्थिर झाली आहे. या कारणावरून आज भाजपचे शिष्टमंडळ दिल्ली येथे गृसचिवांची भेट घेण्यासाठी गेले आहे.

या सर्व परिस्थितींचा संदर्भ देत शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामध्ये भाजपवर टीका केलेली पहायला मिळते. आयएनएस विक्रांत घोट्याळ्यातील आरोपी किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेले तेव्हा संतप्त लोकांनी त्यांच्यावर चपला व दगड फेकले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे भाजपवाले म्हणत असतील तर ते एकप्रकारे चोर, लफंग्यांचे समर्थन करीत आहेत. आयएनएस विक्रांत प्रकरणी पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीला केंद्राने विशेष सुरक्षा कवच दिले आहे. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या नवनीत राणा कौर राणांसाठीदेखील केंद्राने अलगत सुरक्षा कवच दिले आहे. "ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला व केंद्राची सुरक्षा मिळवा" अशी ऑफर बाजारात आलेली दिसते. अशाने कायद्याचे राज्य कोसळून पडेल अशी बोचरी टीका सामन्याच्या अग्रलेखामध्ये भाजपवर केलेली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT