मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ९०टक्केवर पोहचला आहे. म्हणजेच १३ लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला असून अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा व भातसा हे तलाव भरण्यासाठी जेमतेम १ लाख ४४ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे चार तलाव कधीच ओसंडून वाहू लागले. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा ८८ टक्केवर पोहचला आहे. हा तलाव भरण्यासाठी ८३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मध्यवैतरणा तलावातील पाणीसाठाही ९२ टक्केवर पोहचला आहे.
तलावातील पाणीसाठा दशलक्ष (लिटर्समध्ये)
अप्पर वैतरणा - १,८१,९४९ ( ८० टक्के)
मोडक सागर - १,२८,९२५ ,(१०० टक्के)
तानसा - १,४५,०८० (१०० टक्के)
मध्य वैतरणा - १,७८,३३९ (९२ टक्के)
भातसा - ६,३४,०६८ (८८ टक्के)
तुळशी - २७,६९८ (१०० टक्के)
विहार - ८,०४६ (१०० टक्के)
३ वर्षातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
३ ऑगस्ट २०२४ - ११,८६,१९७ (८१ टक्के)
३ ऑगस्ट २०२५ - १२,८९,४५५ (८९ टक्के)
३ ऑगस्ट २०२६ - १३,०३५,०० (९० टक्के)