सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. ७५० वारकऱ्यांसह पालखीचे उद्या सेनगाव शहरात आगमन होणार आहे. पार्श्वभूमीवर नगरपंचायत व गावकऱ्यांकडून स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जाण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. शेगाव येथून ७५० वारकऱ्यांना सोबत घेऊन संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. रिसोड मार्गे, सेनगाव – नर्सि नामदेव – औंढा नागनाथ अशी पायी वारी जाणार आहे.
बुधवारी (दि. १५) रिसोड येथे मुक्काम करून गुरुवारी सेनगाव शहरात पालखीचे आगमन होणार आहे. गावकऱ्यांनी 11 हजार वारकऱ्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली आहे. तसेच भाविकांना श्रीच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे. पालखीसोहळा मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून दोन वर्षांंनी पालखीचे आगमन होणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पोलीस प्रशासनाकडून देखील बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?