मराठवाडा

जालना : ‘पवारांच्या जादुई कांडीने अडीच वर्षांची सत्ता’

अनुराधा कोरवी

सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी मागच्या निवडणुकीनंतर बहुमत नसताना जादूची कांडी फिरवल्याने अडीच वर्षांची सत्ता मिळाली, असे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी केले.

अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी टोपे यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल टिप्पणी केली. टोपे म्हणाले की, सध्या राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. यात अनेक कायदेशीर बाबी आहेत. त्याला नवीन सरकारला सामोरे जावे लागणार आहे. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जादूची कांडी फिरवल्याने बोनस म्हणून मिळाले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ, निसार देशमुख, प्रंताप राखुंडे, मनोज मरकड, सतीश होंडे, सुदाम राठोड, परमेश्वर काळबंडे, सुर्यकांत मोताळे, गोवर्धन राजगुरु, दत्तात्रय साळे, गोवर्धन राजगुरुसह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंचासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आ. राजेश टोपेंचे दौरे आता मतदारसंघात सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT