वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : ऊस कारखानदारांनी ऊस नोंदीमध्ये फेरफार केल्यास आम्ही कारखाना फोडून काढू, असा इशारा वडीगोद्री येथे महाजनसंपर्क अभियान कार्यक्रमात भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य सुनिल आर्दड यांनी दिला. यावेळी घनसांवगी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश बोबडे, अॅड. विजय खटके, सरपंच बंडू मुंडे, बंडू आराध्ये, वैभव खटके, अशोक तारख, प्रकाश आटोळे, मधुसूदन दंडारे आदी उपस्थित होते.
सुनिल आर्दड म्हणाले की घनसावंगी मतदारसंघातील कारखानदारांनी नोंदीमधील तारखेत चूक केल्यास लोकशाही मार्गाने कारखान्याला निवेदन देऊ. त्यात सुधारणा न केल्यास कारखाना कोणत्याही पक्षाचा असो शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तो फोडल्याशिवाय शांत बसणार नाही.
घनसावंगी मतदारसंघात एकूण 240 गावे असून गोदावरी काठावर 35 गावात ऊस आहे. तर 205 गावात ऊस नसून नुसत्या उसावर राजकारण होऊ शकत नाही. आमदार राजेश टोपे हे गेल्या 25 वर्षांपासून उसाचे राजकारण करतात. मात्र, निव्वळ उसावर राजकारण होत नसून घनसावंगी मतदारसंघामध्ये वीज, पाणी, रस्ते असे कामे केल्याशिवाय विकास होत नाही. गेली 25 वर्षात विकास झाल्याचे दिसून येत नाही मी आमदार नसताना सुद्धा 400 कोटींचा रांजनी ते राजाटाकळी 40 किमीचा सिमेंट कोक्रेट रस्ता मंजूर केला आहे. त्याचे लवकरच काम सुरु करणार आहे.राजेश टोपे यांनी गेल्या 25 वर्षात मतदारसंघात एकही रस्ता केला नाही, असा आरोप सुनिल आर्दड यांनी यावेळी केला.
हेही वाचा