Jalna News : पाटाद्वारे आठच किमी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा संताप  File Photo
जालना

Jalna News : पाटाद्वारे आठच किमी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा संताप

अवघडराव सांगवी येथील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Farmers angry over release of only eight km of water through canal

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील धामणा धरणांतर्गत येणाऱ्या सावंगी अवघडराव येथील कोरडवाहू शेतकऱ्यांना पाटाद्वारे पाणी सोडावे, या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पाटबंधारे विभागाला ठराव देण्यात आला आहे. या ठरावाकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने सोळा किलोमीटर पाणी सोडण्याऐवजी आठच किलोमीटर पाणी सोडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अवघडराव सावंगी ग्रामपंचायत कार्यालयच्या वतीने २९ डिसेंबर रोजी सरपंच अरबाज अब्दुल मन्नान बागवान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण ग्रामसभा घेतली. यावेळी सावंगी अवघडराव येथे शेलूद धरणातील पाणी पाटाला सोडणे बाबत ठराव क्रमांक (६) प्रकाश पुंजाजी गाढवे यांनी असे सुचवले कि सावंगी अवघडराव येथे शेलूद धरणातील पाणी हे पाटाला सोडले असता शेतकरी वर्गाला या पाण्याचा रब्बी पिका साठी मोठा फायदा होईल तरी शेलूद धरणाचे पाणी हे सावंगी पाटाला सोडणे साठी असा ठराव घेण्यात आला.

वरिष्ठ कार्यालात प्रस्ताव पाठवण्यात यावा. या संबंधीचे ठराव घेऊन पाटबंधारे विभागाला देण्यात आला. पाटबंधारे विभागाकडून १६ किलोमीटर पाणी सोडण्याऐ बजी फक्त आठ किलोमीटर पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे रब्बी हंगामाती पीके धोक्यात आली आहे. तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या बैठकील गणेश लक्ष्मण फुसे, प्रकाश पुंजाजी गाढवे यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

पाटबंधारे विभागाच्या वतीने १६ किलोमीटर पाटाद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र यावर्षी आठच किलोमीटर पाणी सोडण्यात आले आहे. पाट नादुरुस्त असल्यामुळे अजून आठ किलोमीटर पाणी सोडता येत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तत्काळ या संदर्भात उर्वरित आठ किलोमीटर पाट दुरुस्त करून शेतकऱ्यांनी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सध्या धामणा धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याने सावंगी अवघड येथील कोरवडू शेतकऱ्यांना पाटाला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होतील. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या संदर्भात तत्काळ पाटाला पाणी सोडावे नसता आंदोलन करण्यात येईल.
मनीष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख उबाठा गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT