Vaijapur Rain Agricultural loss
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. तर वैजापूर तालुक्यातदेखील पावसाने धुमाकूळ घातला होता. सोयाबीन, मका ही पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत, तर उसाचे पीक आडवे पडून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे सर्व स्वप्न चिखलात गेले आहे.
पुढारी न्यूजने देखील दोन दिवसांपूर्वी अशा शेतकऱ्यांचा आक्रोश व परिस्थिती दाखवली होती पिके वाहून गेल्याची, शेतात पाणी साचल्याची आणि शेतकरी रडत उभा असल्याची हृदयद्रावक दृश्ये कॅमेऱ्यात टिपली होती. त्याच बातमीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२२) खासदार संदीपान भुमरे आणि पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शिवाराला भेट दिली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, तालुका कृषी अधिकारी ठक्के साहेब, नायव शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी तहसीलदार महाजन, कुमावत, जिल्हा परिषद उपकार्यकारी सातपुते, महावितरण उपकार्यकारी अभियंता पांडव, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे, शहरप्रमुख पारस घाटे, युवा सेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव व तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पेरलेले उगवत नाही, उगवलेले नष्ट होते, फ्फ अशी स्थिती झाल्याने शेतकरी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची वेदना व्यक्त करत आहेत. दिवसरात्र कष्ट करून उभे केलेले पीक पाण्याखाली जाताना पाहून शेतकरी डोळ्यात पाणी आणून शासनाकडे मदतीची आस लावून बसले आहेत.
खासदार, आमदारांनी पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून, तत्काळ मदत करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरून पाहणी केली असून तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.