Contract worth lakhs given for repair of street lights in five-star Shendra MIDC, but no repairs
राहुल जांगड़े
छत्रपती संभाजीनगर: पंचतारांकित शेंद्रा एमआयडीतील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लाखोंचे कंत्राट दिले आहे. मात्र महिना होत आला तरी अद्याप या औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांची स्थिती किंचितही सुधारलेली नाही. काही प्रमुख मार्ग वगळता उद्योगनगरीतील बहुतांश रस्त्यांवरील पथदिवे अजूनही बंदच आहेत. गंभीर म्हणजे, अकार्यक्षम प्रशासनालाही ठेकेदार जुमानत नसल्याने एमआयडीसीत सगळीकडे अंधार आहे.
फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहत नव्हे स्लम
शेंद्रा एमआयडीसीत लहान-मोठे एक हजाराहून अधिक उद्योगांना लख्ख प्रकाश पाडणाऱ्या पथदिव्यांची सुविधा उपलब्ध जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाचीच आहे. यासाठी २००० लाईट्स, ११०० फिटिंग आणि ८५० हुन अधिक पोल आहेत. हे पथदिवे चालू ठेवण्यासाठी दरवषी २७ लाखांचे टेंडर काढले जाते. गतवर्षी असंसो लाईट्स यांना कंत्राट देण्यात आले होते. दुरुस्तीच्या नावाने त्यांनी वर्षभर नुसतेच कागदोपत्री दिवे लावले.
वारंवार तक्रारीनंतरही पदिवे सुरू झाले नाही. येथील ए सेक्टर, बी सेक्टर, डी ब्लॉक, सी ब्लॉक, फूट पार्कसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद पडले आहेत. नुकतेच ५ नोव्हेंबरपासून शहरातील बिटा इलेक्ट्रिकल यांना हे कंत्राट दिले आहे. मात्र या एजन्सीनेही मागील २५ दिवसांत काय केले, किती दिवे लावले, याचा प्रशासनालाही पत्ता नाही. इतकेच नव्हे तर एमआयडीसीत कुठे-कुठे पथदिवे बंद आहे, काय स्थिती आहे. याची साधी पाहणी केलेली नाही. याकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने बंद पथदिवे अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीत. दुसरीकडे संध्याकाळनंतर एमआयडीसीच्या रस्त्यांवर अंधार पडून रात्री भितीदायक वातावरण निमीण होत आहे. लहान-मोठ्या चोऱ्याही होत असल्याने उद्योजक, कामगारवर्ग त्रस्त झाला आहे.
जिथे तक्रार तिथे उजेड, इतर ठिकाणी अंधार
गतवपी ठेकेदाराने पथदिवे दुरुस्तीच्या नावाने कागदोपत्रीच दिवे लावले. कुठे तक्रार आली आणि जास्तच ओरड झाली तर बंद कंपनींसमोरील चालू दिवे काढून तिथे लाव, असे उद्योग झाले. आताही या औद्योगिक वसाहतीत तेच धंदे सुरू असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
कारवाई नसल्याने उद्योजकांचा संताप
पथदिवे दुरुस्तीसाठी लाखोंचे टेंडर काढूनही या औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक फिटिंग, गंजलेले पोल आणि त्यावर लाईट नाही, उघडी केबल हे चित्र बदललेले नाही. बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर अंधार असताना ठेकेदारांविरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याने स्थानिक उद्योजक, कामगारवर्गीकडून संताप व्यक्त होत आहे.
एमआयडीसीचा वचक राहिलेला नाही या औद्योगिक वसाहतीमधील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लाखोंचे टेंडर काढले आहे. मात्र त्यानंतरही नादुरुस्त पथदिवे सुरू झालेली नाही. प्रशासनाचा ठेकेदारांवर वचक नसल्याने एमआयडीसीमधील रस्त्यांवरील अंधार दूर झालेला नाही.-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ