छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी सुखावला

दिनेश चोरगे

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यासाठी परतीचा पाऊस यंदाही वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२०) पासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे केळगाव लघु प्रकल्प दोन दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाला होता. त्यांनतर आज ( दि.२४) चारनेर – पेंडगाव मध्यम प्रकल्पही ओव्हरफलो झाला आहे. पावसाची अशीच मेहरनजर राहिल्यास तालुक्यातील बऱ्याच भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

केळगाव व चारनेर – पेंडगांव धरण पुर्ण क्षमतेने भरले असून तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्प ४० टक्के, अजिंठा – अंधारी मध्यम प्रकल्प ४१ टक्के, हळदा – जळकी ३८ टक्के, उंडनगांव २६ टक्के, या धरणांची पाणी पातळी वाढत असल्याने तालुका सुखावला आहे.
मात्र दुसरीकडे पावसाळा संपत आलेला असतांनाही तालुक्यातील निल्लोड व रहिमाबद ही दोन्ही जलसाठे अद्यापही जोत्याच्या खालीच आहेत. त्यामुळे  या धोरणांवर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT