संतोष देशमुख हत्या प्रकरण. (Pudhari photo)
बीड

Santosh Deshmukh Murder Case: विष्णू चाटेने मागे घेतला अर्ज ते वकिलांची पेन ड्राईव्हची मागणी; सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली, आज कोर्टात नेमकं काय घडलं?

पुढारी वृत्तसेवा

Santosh Deshmukh Murder Case

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सोमवारी (दि.१९) विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने आज आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याबाबतचा अर्ज मागे घेतला. मी निर्दोष असून या प्रकरणाशी माझा संबंध नाही, असा आशयाचा अर्ज त्याने मागच्या सुनावणीला दाखल केला होता. मात्र त्यांच्या वकिलाने हा अर्ज मागे घेतला.

दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आणि प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याचे वकील विकास खाडे यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेस सरकारी वकिलाकडून जी कागदपत्रे मिळाली, त्या आधारावर या घटनेशी संबंध नसल्याचा अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी ३ जूनपर्यंत पुढे ढकलली.

या शिवाय आरोपीचे वकील खाडे यांनी न्यायाधीशांकडे खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे आणि तसेच पुराव्यासंबंधीची सविस्तर माहिती अद्यापही बचाव पक्षाला मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पेन ड्राईव्ह अद्याप मिळाला नाही, असे आरोपीच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी बचावपक्ष मागणी करत असलेले सर्व पुराव्यासंबंधीची माहिती तसेच अत्यावश्यक कागदपत्रे तत्त्काळ देण्यासंदर्भात सूचना केल्या.

उज्वल निकम गैरहजर

19 मेरोजीच्या सुनावणीला धनंजय देशमुख यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर होते. यामुळे आजच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते.

पेन ड्राईव्हची मागणी

आरोपींचे वकील विकास खाडे यांनी न्यायालयात पेनड्राईव्हची मागणी केली. 'या हत्याप्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपींना मिळणे गरजेचे आहे.

या हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे. तो आरोपींना मिळणे गरजेचे आहे. तो आरोपींसाठी महत्वाचं आहे. म्हणून आम्ही पेंनड्राइव्हची मागणी केली आहे. काही पुरावे दिलेले आहे. काही पुरावे मिळणे बाकी आहे. काही पुरावे कोर्टात सादर नाहीत, तेदेखील न्यायालयात सादर केले जाणार आहे.

डिस्चार्ज ऍप्लिकेशनावर तिन्ही मूळ फिर्यादी कडून म्हणणं मांडण्यात आले आहे...

आतापर्यंत नेमकं काय घडलं?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला खंडणी हेच प्रमुख कारण असून, हा सगळा प्रकार वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याआधीच्या सुनावणीवेळी केला होता. या प्रकरणाचा घटनाक्रम अगदी प्रारंभापासून न्यायालयासमोर मांडत केस ओपन करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर कराडचे वकील विकास खाडे यांनी आक्षेप घेत, आम्ही जे पुरावे न्यायालयाकडे मागितले होते ते अद्याप मिळाले नसल्याचे लक्षात आणून दिले होते. तसेच कराड यांच्यावर लावलेले आरोप आम्हाला मान्य नसल्याचे सांगत डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल केले होते.

संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी अपहरण करून करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक झाली असून एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT